वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू मा.डॉ. इंद्रामणी सर यांच्या प्रेरणेतून व संचालक, कृषि विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांच्या अधिपत्याखाली व कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड-1 यांच्या च्या समन्वयातून शेतकरी - शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद उपक्रम हा सद्य परिस्थितीत पिकांची घ्यावयाची काळजी व पर्यायी पिके लागवड या विषयावर 69 वा भाग आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) कृ. वि. के पोखर्णी यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र,पोखर्णी, नांदेड-1 चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख ( उद्यानविद्या तज्ञ), यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले त्यांनी प्रस्ताविकात सद्य परिस्थितीतील पिकांची आवस्था व त्यांची घ्यावयाची काळजी यावर भाष्य केले.प्रा. संदीप जायभाये यांनी पर्यायी पीक म्हणून चिया लागवड तंत्रज्ञान याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर प्रा. माणिक कल्याणकर ( पीक संरक्षण तज्ञ) यांनी सद्य परिस्थितीतील पिकांच्या किड, रोग व उपाय यावर मार्गदर्शन केले.डॉ. महेश अंबोरे ( पशुवैद्यक तज्ञ) यांनी पशुधन व त्यांची घ्यावयाची काळजी व सौं. अल्का पवळे ( ग्रह विज्ञान तज्ञ) यांनी चिया वनस्पतीचे महत्व व आरोग्याला होणारे फायदे व चियाचे विविध पदार्थ या बद्दल माहिती दिली डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी चिया -काढणी पच्छात तंत्रज्ञान- विक्री व्यवस्था / बाजारपेठ /पॅकेजिंग व साठवण याबद्दल मार्गदर्शन केले.शेतकरी प्रतिनिधी व कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी च्या संपर्कात असलेले चिया पिकाचे यशस्वी रित्या लागवड करणारे श्री. बालाजी महादावड यांनी चिया पिका बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड करावी असे आवाहन केले. तसेच व. ना. म. कृ. वि. परभणी चे डॉ. प्रशांत देशमुख( मुख्य विस्तार अधिकारी) डॉ. कैलास डाखोरे (विद्यापीठ हवामान शास्त्रज्ञ),यांनी आगामी हवामान स्थिती व त्यानुसार पीक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या ऑनलाईन शेतकरी -शास्त्रज्ञ संवादामध्ये 68 शेतकऱ्यांचा सहभाग होता, व. ना. म. कृ. वी परभणी चे डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी सद्यपरिस्थितील सोयाबीन व तूर पिका बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प (NARP) चे सहयोगी संचालक संशोधन (ADR) डॉ. एस. बी. पवार यांनी कापूस, सोयाबीन, तूर, मका तसेच रब्बी हंगामा तील पीक जसे गहू, हरभरा, ज्वारी व इतर पिका बद्दल माहिती दिली व शेतकऱ्यांनी पिकांची फेरफालट करावी असे आवाहन केले ज्यामुळे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीत टिकून राहतील. यानंतर व. ना. म. कृ. वी चे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी मेहत्रे यांनी पर्यायी पीक म्हणून चिया पिकांची लागवड करावी असे उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले .प्रा.प्रफुल घंटे डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी ही उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमासाठी डॉ. डी. आर. कांबळे, डॉ. मारुती गरुड या कार्यक्रमासाठी श्री. राकेश वाडीले कृ. वि. के. पोखर्णी यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी केले.
No comments:
Post a Comment